साखरे ऐवजी “गुळाचा” आहारात समावेश करा आणि बघा फायदे

सर्वसाधारणपणे आहारात कोणताही गोड पदार्थ खातो तेव्हा त्यामध्ये आपल्याला साखरेचा वापर केला आहे कळते. आणि काहीवेळा गोड पदार्थ तयार करण्यासाठी गुळाचा देखील वापर केला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का साखरेच्या तुलनेत गुळाचे अनेक फायदे आहेत. आहारात जर आपण साखर न वापरता गुळाचा वापर केला तर बऱ्याच आजारांपासून सुटका देखील मिळवता येईल.
सर्वात मह्त्वाचं म्हणजे गुळाचा आहारात समावेश केल्याने एन्ड्रो फिन्स हा हॅपी हा र्मोन तयार होत असतो. आणि त्याचमुळे तुम्हाला जर आनंदी राहायचे असेल आणि मुड चांगला ठेवायचा असेल तर आजच आहारात गुळाचा समावेश करा. साखरेच्या सेवनाच्या तुलनेने अनेक फायदे याचं सेवन केल्यामुळे शरीराला होत असतात.
भारतामध्ये ऊसापासून तयार केले जाणारा गुळ आणि साखर या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. गुळापासून तयार करण्यात येणारे पदार्थ खाल्यामुळे शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित राहते. जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते. घसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खल्ल्याने आराम मिळतो.
पोटासंबंधित विकार दूर होण्यास मदत – पोटाच्या निगडित असणाऱ्या बऱ्याच आजारांत गुळ खूप फायदेशीर आहे. गुळाचे सेवन केल्यामुळे आपले पचन तंत्र सुधारले जाते. जेवल्यानंतर गुळ खाल्ल्याने पचनक्रिया आणखी चांगली होते. डॉक्टर गर्भ वती स्त्रियांना देखील गुळ खाण्याचा सल्ला देतात. कारण अनेकवेळा त्यांना पोट साफ होण्यास त्रासाचा सामना करावा लागतो.
वजन कमी करण्यासाठी – जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर साखरेच्या चहाचं सेवन न करता वजन कमी करण्यासाठी गुळाच्या चहाचं सेवन करू शकता. त्यामुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल.
दम्याच्या त्रासापासून सुटका – थंडीत ज्यांना दम्याचा त्रास आहे अश्या लोकांना मोठ्या प्रमाणा त्रास हा सहन करावा लागतो. ऑक्सिजनची कमतरता व वाढत्या प्रदुषणामुळे श्वास घेण्यास दम्याच्या रुग्णांना त्रास होतो. अशावेळी त्यांच्या शरीरामध्ये उष्णता सतत राहावी आणि कफ बाहेर पडावा यासाठी रोज दूध व गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.
मधूमेहासाठी फायदेशीर – मधुमेहावर गुणकारी गूळ- गूळ साखरेच्या तुलनेत खूप फायदेशीर आहे. गुळामध्ये कॅल्शियम आणि लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण संतुलित राहते.
मासिक पा ळीचा त्रास कमी होतो – मासि कपाळी दरम्यान अनेकांना पोटदुखीच्या त्रासाने ग्रस्त असतात. ह्या त्रासातून मुक्तता मिळविण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. गुळ खाल्ल्याने पोट दुखीचा त्रास कमी होतो. तसंच गुळाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात आयर्नची कमतरता भासत नाही. तसंच एनि मियामुळे त्रासलेल्यांसाठी गूळ खूप फायदेशीर आहे.