या 6 लोकांसोबत होते ऐश्वर्याचे ‘संबंध’, परंतु त्यांचे प्रेम नाकारून केले अभिषेक सोबत लग्न

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची चित्रपट कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. ऐश्वर्या राय ही भारतातील लोकप्रिय आणि हाय प्रोफाइल सेलिब्रिटीपैकी एक मानली जाते. ऐश्वर्या रायने आपल्या सौंदर्याने आणि उत्तम अभिनयाने करोडो लोकांची मने जिंकली आहेत.आपल्या सर्वांना माहितच आहे की ऐश्वर्या राय ही “बच्चन कुटुंबा” ची सून आहे.
ऐश्वर्या रायचे अभिषेक बच्चन यांच्याशी लग्न झाले आहे. त्यांचा विवाह हा भारतातील एक हाय प्रोफाइल विवाह सोहळा होता ज्यामध्ये केवळ काही ठराविक लोकांनाच आमंत्रित केले गेले होते. तिचे लग्न सर्व रीतीरिवाजांनी झाले होते. तसे, आपल्या सर्वांना हे चांगलेच ठाऊक आहे की अभिषेक बच्चन हे ऐश्वर्या रायच्या आयुष्यात येणारे पहिले प्रेम नाही.
ऐश्वर्या रायची बॉलिवूड इंडस्ट्रीतील दबंग अभिनेता सलमान खानसोबतची लव्ह स्टोरी काही काळापूर्वी खूप चर्चेत होती परंतु नंतर त्यांचे ब्रेकअप झाले पण आजही ऐश्वर्या आणि सलमानच्या प्रेमाच्या कहाण्या अजूनही आपल्या कानावर येत असतात. तसे तुमच्या माहितीसाठी सलमान देखील ऐश्वर्याचा पाहिलं प्रेम नव्हतं. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे ऐश्वर्या रायला ज्या लोकांनी आपले सर्वस्व मानले होते व तिच्या प्रेमात पडले होते त्यांच्याबद्दल माहिती देणार आहोत.
1) राजीव मूलचंदानी – ऐश्वर्या रायच्या आयुष्यात आलेली पहिली व्यक्ती राजीव मूलचंदानी होती. जेव्हा ऐश्वर्या राय मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यात मग्न होती, त्याचवेळी राजीव मूलचंदानी तिच्या आयुष्यात आले. हळूहळू या दोघांमधील जवळीक वाढू लागली, पण जेव्हा ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब जिंकला तेव्हा ती राजीव मूलचंदानीपासून दूर गेली. त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले.
2) हेमंत त्रिवेदी – ऐश्वर्या रायचे नावही थोड्या वेळापूर्वी फॅशन डिझायनर हेमंत त्रिवेदीशी जोडले गेले होते.तुमच्या माहितीसाठी की जेव्हा ऐश्वर्या रायने डोक्यावर मिस वर्ल्डचा मुकुट परिधान केला होता, त्यावेळी ऐश्वर्याचा हेमंत त्रिवेदीने डिझाइन केलेला गाऊन घातला होता.
3) अक्षय खन्ना – अक्षय खन्ना याला अभिनेत्री ऐश्वर्या रायवर खूप प्रेम करत होता. बातमीनुसार असे म्हटले जाते की “आ अब लौट चले” चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हे दोघे एकमेकांच्या खूप जवळचे झाले होते. अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या यांनी ‘ताल’ या चित्रपटात देखील एकत्र काम केले होते. रिपोर्ट्सनुसार असे म्हणतात की सलमान खानसाठी ऐश्वर्या रायने अक्षय खन्नाला आयुष्यातून बाहेर केले होते.
4) सलमान खान – एक काळ असा होता की सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या खुल प्रेमात पडले होते. एवढेच नाही तर कायम एकत्र राहण्याची शपथ देखील घेतली होती. या दोघांच्या प्रेमाची सुरूवात ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या शूटिंगपासून झाली. त्या दिवसांत या दोघांची प्रेमकहाणी खूप चर्चेत होती. प्रत्येकाला असे वाटत होते की ऐश्वर्या आणि सलमान यांचे लग्न होईपर्यंत त्यांचे प्रेम टिकून राहू शकते, पण नशीबात काहीतरी वेगळंच होतं. सलमान खानच्या वागण्यामुळे ऐश्वर्या रायने त्याच्यासोबत ब्रेकअप झाला केला.
5) विवेक ओबेरॉय – ऐश्वर्या रॉयचे विवेक ओबेरॉयशीही नाव जोडले गेले होते. असे म्हणतात की विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या एकमेकांबद्दल बरेच गंभीर झाले होते.काही कमी काळातच या दोघांची प्रेमकथा बराच चर्चेचा विषय बनला होता. सलमान खानच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या पूर्णपणे स्तब्ध झाली होती. त्यानंतर विवेक ओबेरॉय तिचे समर्थक बनले होते.
“क्यों हो गया ना” या चित्रपटाच्या दरम्यान विवेक आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या जवळ आले आणि हळूहळू या दोघांमधील अंतर आणखी जवळ येऊ लागले. विवेक ओबेरॉय ऐश्वर्या रायच्या पूर्णपणे प्रेमात पडला. रिपोर्ट्सनुसार असे म्हणतात की विवेक ओबेरॉय यांना सलमान खानचे धमकीचे फोन येत असत त्यानंतर विवेक ओबेरॉय यांनी पत्रकार परिषदेत सलमान खानविरोधात विधान केले. या पत्रकार परिषदेनंतर ऐश्वर्या राय विवेकपासून दूर गेली होती आणि शेवटी त्यांचे देखील संबंध तुटले.
6) अभिषेक बच्चन – तुमच्या माहितीसाठी की, ऐश्वर्या रायने शेवटी अभिनेता अभिषेक बच्चनसोबत वर्ष 2007 मध्ये लग्न केले. या दोघांना आराध्या बच्चन नावाची एक गोड मुलगी देखील झाली आहे.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.