वाईट बातमी ! अमिताभ बच्चन यांचा गंभीर अपघात, पायाची नस कापली, प्रकृती बाबत मोठी अपडेट

बॉलिवूडचे महानायक म्हटले की, अमिताभ बच्चन यांचे नाव डोळ्यासमोर उभे राहते. अमिताभ बच्चन यांना महानायक, सुपरस्टार यासारख्या पदव्या बहाल केल्या आहेत. बच्चन यांनी आजवर जवळपास पन्नास वर्ष बॉलीवूडमध्ये काम केले आहे. आजवर त्यांनी पाच पिढ्या बॉलीवूडमध्ये पहिल्या आहेत.
अशा या महान अभिनेत्यासमोर काम करणे हे कोणाचेही स्वप्न असते. मात्र, काही अभिनेत्रींनी असे वाटते की, त्यांच्या सोबत काम केल्याने आपल्याला न्याय मिळणार नाही. अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांतून काम केलेले आहे. मध्यंतरीच्या काळात म्हणजेच 1996 ते 98 दरम्यान त्यांचा अतिशय खडतळ काळ होता.
त्याच कालखंडात त्यांनी ए बी सी एल कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी तेरे मेरे सपने हा चित्रपट प्रदर्शित केला होता. हा चित्रपट त्यावेळी बऱ्यापैकी चालला होता. त्यानंतर या कंपनीला तोटा झाला आणि बच्चन यांचे खूप नुकसान झाले. त्यावेळी दिवंगत नेते अमरसिंह यांनी बच्चन यांची मैत्री निभावत त्यांना मदत केली होती. त्यानंतर बच्चन स्थिरावले होते.
त्यानंतर बच्चन बॉलीवूड मध्ये येण्यास झगडत होते. अशाच वेळी त्यांना कोण बनेगा करोडपती’ ही मालिका चालून आली. त्यानंतर त्यांनी या मालिकेच्या माध्यमातून देशभरात पुन्हा आपला दबदबा निर्माण केला. ही मालिका एवढी गाजली की ती अजूनही चालूच आहे. या मालिकेद्वारे बच्चन यांनी अमाप पैसा कमावला. त्याच कालखंडामध्ये अभिनेत्रींना बच्चन यांच्यासोबत काम करायचे होते.
अमिताभ बच्चन यांनी 1969 मध्ये सात हिंदुस्तानी या चित्रपटातून पदार्पण केले होते. अमिताभ बच्चन यांच्या बाबतीमध्ये नुकतीच एक बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन हे चित्रीकरण करत असताना त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळेस त्यांच्या पायाची नस कापल्या गेल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येते. अमिताभ बच्चन यांनी याबाबत सांगितले की, बुटा मधील एक लोखंडी धातू माझ्या पायाला लागला. त्यामुळे रक्ताची धार वाहू लागली. मात्र, वेळीच मला माझ्या कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. आता माझी प्रकृती उत्तम आहे, असे अमिताभ यांनी सांगितले.