हिरव्या वेलचीपेक्षा काळ्या वेलचीच्या सेवनाने अनेक गंभीर आजारांपासून मिळेल सुटका….

दिवाळी नुकतीच होऊन गेली आहे. फटाके मोठ्या प्रमाणावर उडवण्यात आलेले आहेत. यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे अनेकांना सर्दी-खोकला श्वसनाचे आजार जडले आहेत. त्यासोबतच. कोरोना महामारी चा आजार देखील आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपली प्रतिकारशक्तीही चांगली ठेवावी लागत आहे.
आम्ही आपल्याला आज मोठी विलायची खाण्याचे फायदे सांगणार आहोत. मोठी विलायची खाल्ल्याने आपल्याला सर्दीसह इतर आजारांवर देखील मात करू शकता. हे खाल्ल्याने आपले फ्फुफुस देखिल साफ होत असते. चला तर मग जाणून घेऊया आपण वेगवेगळे फायदे..
1) कफ : दिवाळीत झालेल्या मोठ्या प्रदूषणामुळे अनेकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. श्वसन मार्गात अनेकांना अडथळे निर्माण झाले आहेत.मोहरीच्या तेला सोबत आपण मोठ्या विलायचीचे सेवन केल्यास आपल्याला छातीत साचलेला कफ हा दूर होऊ शकतो. तसेच इतर फायदे देखील आहेत.
2) ऋतू बदल : ऋतू बदल झाल्यामुळे अनेकांना सर्दी-खोकला श्वसनसंबंधी आजार निर्माण होतात. यावर आपण महागडे औषध घेऊन उपाय करता. मात्र, आपण मोठी विलायचीचा वापर करून यावर मात करू शकता. मोठ्या विलायची मध्ये एंटीऑक्सीडेंट तत्व असतात. त्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती ही वाढत असते. त्यामुळे आपण आजारी नाही पडत.
3) हृदय : मोठ्या विलायचीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. तसेच खनिजांचे प्रमाण देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मोठी विलायची खाऊन आपण आपले हृदय देखील निरोगी ठेवू शकता. याचा वापर आपण नेहमी करावा.
असा करा वापर
मोठ्या विलायचीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑंटी ऑक्सीडेंट तत्व असतात.यामुळे त्याचे सेवन करून आपण अनेक आजारांवर मात करू शकता. श्वसन, सर्दी, खोकला यावर देखील आपल्याला उपाय मिळू शकतो. गरम पाणी करावे. त्यामध्ये विलायची टाकावी. दालचिनी टाकून उकळून घ्यावे. त्यानंतर त्यात मध टाकावा. हे मिश्रण थंड करावे. त्यामध्ये पुदिना टाकून पुन्हा उकळून घ्यावे. अशाप्रकारे ही वाफ घ्यावी, असा प्रयोग नेहमी करावा. यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.