या व्यक्तीवर ‘जिवापाड’ प्रेम करायची ऐश्वर्या, परंतु प्रसिद्धी मिळतात त्याला केले…

हुस्न की मल्लिका ऐश्वर्या राय ही कोणाला माहिती नाही असे कोणीच नाही. ऐश्वर्या ही अशी स्त्री आहे जिने फक्त तिच्या सुंदरतेच्याच नाही तर दमदार अभिनयामुळे देखील लोकांच्या मनावर राज्य केले आहे. ऐश्वर्या ही एक सौंदर्याचे उदाहरण आहे. तिच्यासारख्या सुंदर स्त्रीया या जगात क्वचितच असतील.
जरी आज प्रियंका आणि दीपिका हॉलिवूडमध्ये बरीच नाव कमावत आहेत, पण प्रत्यक्षात ऐश्वर्याने बॉलिवूडची ओळख पूर्ण जगाला करून दिली आहे. ऐश्वर्याचेत जगभरातील कोट्यावधी चाहते आहेत. ऐश्वर्याच्या लव्ह लाईफबद्दल बोलले गेले तर ती कुणापासून लपलेली नाही.
सर्वांना ठाऊक आहे की ऐश्वर्याने सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांना डेट केले आहे. पण सलमान खानसोबतचे तिचे संबंध खूप दिवस होते. सलमान खान आणि ऐश्वर्याच्या अफेअरच्या बातम्या त्या दिवसात बरेच चर्चेचा विषय ठरत होत्या.
सलमान आणि विवेक बद्दल बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे का यापूर्वीही ऐश्वर्याचा एक प्रियकर असायचा ज्यावर ती खूप प्रेम करायची. खरं तर, ऐश्वर्याच्या करियरच्या सुरुवातीच्या काळातल्या मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये ती राजीव मूलचंदानी यांना डेट करायची.
होय,ऐश्वर्या तिच्या सुरुवातीच्या काळात राजीव मूलचंदानीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.मॉडेलिंगच्या दिवसांत दोघांची भेट झाली. राजीव देखील व्यवसायाने एक मॉडेल होता. एकत्र काम करत असताना दोघे एकमेकांच्या अगदी जवळ आले आणि त्यांचे प्रेम झाले. या दोघांचेही अनेक फोटोशूट्स झाले. दोघे बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये राहिले.
नंतर 1994 मध्ये ऐश्वर्याला मिस वर्ल्ड हा किताब भेटल्यानंतर व पुढे देखील अनेक यश तिच्या पदरात पडायला लागले आणि ऐश्वर्याने यशाची उंची गाठायला लागताच तिने राजीवशी अंतर निर्माण करण्यास सुरवात केली. जेव्हा लोकांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऐश्वर्या रायला ओळखण्यास सुरुवात केली तेव्हा तिने राजीवशी असलेले आपले संबंध कायमचे तोडले.
ऐश्वर्या काही दिवसातच बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आणि त्याच बरोबर तिचे सलमान खानशी संबंध बनले. संजय लीला भन्साळी सलमान खानचा चांगला मित्र होता आणि सलमानने ऐश्वर्याला हम दिल दे चुके सनम या चित्रपटात घेण्याची विनंती केली. हा चित्रपट बनला आणि तो चित्रपट देखील सुपरहिट झाला या चित्रपटानंतर ऐश्वर्या एका रात्रीतून स्टार बनली आणि मग तिने मागे वळून पाहिलेच नाही.
मात्र, सलमान खानबरोबर बिघडत चाललेल्या संबंधाबाबत ती नेहमीच चर्चेत राहिली. बातमीनुसार ऐश्वर्याच्या आई-वडिलांना सलमान आवडत नव्हता, पण ती सलमानबरोबर तिच्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन राहू लागली. पण सलमानच्या शंका, मा र हा ण व जिद्दी स्वभावाच्या सवयीने घाबरून काही दिवसातच ती घरी परतली.
तिचे सलमानशी संबंध इतके खराब झाले की नंतर तिने त्याच्याशी संबंध तोडले. नंतर तिचा विवेक ओबेरॉयशी संबंध आला पण विवेकबरोबरही तिचा ब्रेकअप झाला. अखेर तिने २००० साली अभिषेक बच्चनसोबत लग्न केले.