अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी विनोदवीर सागर कारंडे करायचा हे काम, वाचा त्याचा प्रवास

अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी विनोदवीर सागर कारंडे करायचा हे काम, वाचा त्याचा प्रवास

झी मराठीवर प्रदर्शित होणार कार्यक्रम चला हवा येऊ द्या या शोमुळे अभिनेता सागर कारंडे याचे नाव आज घराघरात व प्रेक्षकांच्या मनामध्ये पोहोचले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यापूर्वी सागर कारंडे एका खाजगी कंपनीत काम करायचा. आणि हे खूप कमी लोकांना माहिती असेल.

कॉम्प्युटर इंजिनीयरिंगमधून सागरने डिग्री घेतलेली आहे. डिग्री आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सागर कारंडे एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होता. पण अभिनयाची ओढ त्याला कायम होती. नाटक करण्याचा ध्यास असलेल्या सागरचा जीव नोकरीत रमेनासा झाला. अखेर सागरनं नोकरी सोडत पूर्णवेळ व्यावसायिक नाटकात उतरण्याचा निर्णय घेतला.

सागरचं कॉमेडीचं टायमिंग इतकं सहज आहे कि प्रेक्षक त्याच्या विनोदांना दाद दिल्यावाचून राहत नाहीत. इंटरनेट, इ-मेल, मोबाइलच्या काळात पोस्टमन ही संकल्पना इतिहासात जमा होण्याची वेळ आली होती. परंतु ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात सागरने साकारलेला पोस्टमन पाहून प्रेक्षक नॉस्टाल्जिक झाले.

एका मुलाखती दरम्यान सागरने आपल्या वैयक्तिक आयुष्यातबाबत अनेक खुलासे केले होते. त्यावेळी सागर म्हणाला होता की, ”माझे वडील आणि काका मुलाखतीसाठी कंपन्यांमध्ये पाठवायचे. परंतु मला तिथे जाण्यात जराही रस नसल्यानं इकडेतिकडे फिरायचो आणि नंतर माझी निवडच झाली नाही असं घरी फोन करून सांगायचो.”

स्ट्रगलच्या दिवसांमधला मजेशीर किस्सा सागरनं सांगितला, ” त्यावेळी नाटकातून पैसे मिळायचे हे मला माहीतच नव्हतं. चर्चगेट येथील एलआयसीच्या कार्यालयात सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी काहीतरी मनोरंनात्मक कार्यक्रम सादर करायला मला बोलावलं.मी तिथं गेलो आणि दहा मिनिटांच नाटकुले सादर केले. त्याचे मला एकशे एक रुपये मानधन मिळालं. माझ्या उभ्या आयुष्यात मानधन हा शब्द त्यावेळी पहिल्यांदा ऐकला होता.”

असेच भन्नाट व्हायरल माहिती वाचण्यासाठी आमचे पेज लाईक करा

Team Hou De Viral